Ad will apear here
Next
नेपाळशी मैत्रीला कराराचे ‘इंधन’
नवी दिल्ली : भारताने नेपाळला दर वर्षी १३ लाख टन इंधनाचा पुरवठा करण्याचा करार केला आहे. या करारानुसार इंडियन ऑइल ही सरकारी कंपनी पुढील पाच वर्षे नेपाळला पेट्रोल, डिझेल, घरगुती वापराचा नैसर्गिक वायू, केरोसीन, हवाई इंधन यांचा पुरवठा करणार आहे. 

भौगोलिकदृष्ट्या भारत आणि चीनच्या मध्यभागी असणाऱ्या नेपाळला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न भारत आणि चीनकडून होत असतोच. चीनच्या मनसुब्यांना शह देणे हा करार करण्यामागचा आणखी एक हेतू आहे. भारताकडून १९७४पासून नेपाळला पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा करण्यात येत होता. हा पुरवठा २०१५च्या आंदोलनावेळी विस्कळीत झाला. सध्या इंधन पुरवठ्याचे प्रमाण १० लाख टनापर्यंत आहे. या पार्श्वभूमीवर ‘इंडियन ऑइल’ने हा पाच वर्षांसाठीचा करार केला आहे. या कराराच्या नूतनीकरणाच्या वेळी म्हणजे २०२२मध्ये इंधनाच्या प्रमाणाविषयी पुन्हा विचार करण्यात येणार आहे.

या पुरवठ्यासाठी बिहारमधील बरौनी आणि पश्चिम बंगालमधील हल्दिया या तेलशुद्धीकरण प्रकल्पातून पेट्रोलियम उत्पादने मिळतील. नेपाळला नैसर्गिक वायूचा पुरवठा करणे अधिक सुकर होण्यासाठी पाइपलाइन टाकण्याचा विचार सुरू आहे. पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा करण्यासाठी रक्सौल ते अमलेखगंज अशी पाइपलाइन बांधण्यात येणार आहे. नेपाळच्या संसदेने या पाइपलाइनची जबाबदारी घेतली आहे. ही पाइपलाइन काठमांडूपर्यंत नेण्याचा नेपाळ सरकारचा विचार आहे.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UYWNBA
Similar Posts
सौदी अरेबियाची गुंतवणूक वाढावी यासाठी ‘इंडिया इन्व्हेस्ट ग्रिड’ची स्थापना नवी दिल्ली : सौदी अरेबियाची भारतातील गुंतवणूक वाढवण्यासाठी ‘इन्व्हेस्ट इंडिया ग्रिड’ची स्थापना करण्यात आली आहे. सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेल्या नीती आयोगाच्या शिष्टमंडळाच्या भेटीत ‘इन्व्हेस्ट इंडिया ग्रिड’ची घोषणा करण्यात आली.
देशातील पहिली एअरट्रेन नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर होणार नवी दिल्ली : नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंतर्गत प्रवासासाठी लवकरच ‘एअरट्रेन’ सुरू केली जाणार आहे. एअरट्रेन म्हणजे खास विमानतळासाठी असलेली मेट्रो रेल्वेची सुविधा. अशी सुविधा असणारा हा देशातील पहिला विमानतळ ठरणार आहे.
जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी भारतीय संघ रवाना नवी दिल्ली : जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय संघातील ४८ स्पर्धकांना नवी दिल्ली येथे झालेल्या एका विशेष सोहळ्यात निरोप देण्यात आला.
दहा सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण होणार नवी दिल्ली : देशातील दहा सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (३० ऑगस्ट २०१९) नवी दिल्लीत केली. त्यामुळे सरकारी बँकांची संख्या २७वरून १२ होणार आहे. विलिनीकरणानंतर बँक कर्मचाऱ्यांची कोणतीही कपात केली जाणार नाही, असेही सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language